मराठवाडा

औरंगाबाद: जिहादी मानसिकते विरोधात सकल हिंदू समाज एकवटला

मोनिका क्षीरसागर

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा:  गेल्या अनेक दिवसांपासून कट्टरवादी शक्तींकडून हिंदूंच्या सातत्याने हत्या करण्यात येत आहे. उदयपूर, अमरावती तसेच देशातील विविध भागात हत्यांचे सत्र सुरु आहे. या जिहादी मानसिकतेविरोधात सकल हिंदू समाजाने मूक मोर्चा आयोजित करण्‍यात आला. शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा पैठण गेटपासून सुरु होऊन गुलमंडीमार्गे महात्मा फुले चौक येथे पोहोचला. पडत्या पावसाताही हिंदू समाज मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाला होता.

विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष, समाज, पंथ, गणेश मंडळ या मोर्चात सहभागी झाले होते. सातत्याने होणाऱ्या हिंदूंच्या हत्‍यांविरूद्ध या मोर्चात सहभागी आंदोलकांनी दंडावर काळ्या फीती बांधून या घटनांचा निषेध केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार राष्ट्र चालावे यासाठी मोर्चात फलके दाखवण्यात आली. तसेच हाती भगवे ध्वज, मस्तकी टीळा व डोक्यावर भगव्या टोप्या घालून हिंदू समाज मोर्च्यात सहभाही झाला.

महिला, तरुणांचा मोठा सहभाग

या मोर्चात हिंदू महिला आणि तरूणांचा लक्षणीय सहभाग होता. मोर्चाची शांती मंत्राने सुरुवात आणि शेवट महात्मा फुले पुतळ्याजवळ संत महात्म्याच्या दर्शनाने झाली. विश्वशांतीसाठी पसायदान ही म्हणण्यात आले. यावेळी औरंगाबाद शहराच्या नामंतराचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने पारीत केल्यामुळेच आनंद व्यक्त करण्यात आले. तसेच शासन स्थरावर उर्वरीत प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी इच्छा देखील व्यक्त केली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT