कोनवडे : राम देसाई
गेली सात दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने काल (शनिवार) रोजी विश्रांतीनंतर पुरस्थिती कमी होत चालली आहे. त्यामुळे पुराचे पाणी कमी होत चालले आहे . आज ( दि .२८ ) रोजी सकाळी नऊ वाजता तब्बल ५४ तासानंतर खुला करण्यात आला आहे. सध्या मडीलगे बुद्रुक-कुर दरम्यानच्या रस्त्यावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरळीत चालु आहे. पावसाचा जोर कमी आल्याने महापुराचे पाणी कमी होत आहे.
सध्या पाटगाव धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी आल्याने धरण ९७ .३४ % भरले असुन धरणातून २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग चालु आहे. कोंडोशी प्रकल्प १०० % भरला असुन १०० क्युसेकने विसर्ग चालु आहे.
गेली आठवडाभर कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे वेदगंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पुरIस्थिती कायम आहे. पुराचे पाणी पिकामध्ये राहिल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. सोसाट्याच्या वाऱ्याने ऊस पिके कोलमडुन गेली आहेत. त्यामुळे नदीकाठ्याच्या पिकांबरोबर शिवारातील ऊस पिकाच्या नुकसानीने शेतकरी चिंताक्रात आहे. तसेच सोसाट्याच्या वाऱ्याने विद्युत तारा तुटुन विजपुरवठा खंडीत होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कोनवडे, नाधवडे, टिक्केवाडी, कुर येथील नागरिकांना वारंवार विद्युत खंडीतचा त्रास सहन करावा लागला.
आठवडाभर पडणाऱ्या पावसाने शेत शिवारात तसेच नदी, नाले भरून वाहत आहेत. यामुळे पाटगाव धरणावरील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या वर्षी दुसऱ्यांदा पाणी पात्राबाहेर गेल्याने पुरस्थितीवर प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अर्चना पाटील, भुदरगड पोलीस स्टेशन, महसुल विभाग लक्ष ठेवुन नागरिकांना वेळोवेळी सुचना देत आहे.