पुढारी ऑनलाईन डेस्क : Kolhapur Flood : कोल्हापूरमध्ये शनिवारी (दि. 27) रात्री आणि रविवारी (दि. 28) पहाटे पावसाचा जोर कमी राहिला. ज्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी कमी होण्यास मदत झाली. नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
काल शनिवारी ते आज रविवार पहाटे 5 पर्यंत सलग 8 तास पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फूट 8 इंचावर स्थिर राहिली. आज सकाळी 6 वाजता पाणी पातळीत 1 इंच घट होऊन 47 फूट 7 इंच झाली. पुढे 7 सात वाजता देखील हीच पातळी कायम राहिली. दरम्यान, जिल्ह्यतील 95 बंधारे पाण्याखाली आहेत.