तरूणाचा रेल्वेतून पडून मृत्यू  
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : गणेशोत्सवानिमित्त गावी येत असलेल्या तरूणाचा रेल्वेतून पडून मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

देवगड : गणेशोत्सवानिमित्त गावी येत असलेल्या तरूणाचा रत्नागिरी-आरवलीदरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. आत्माराम शरद सावंत (वय ३०, रा. मुणगे, सावंतवाडी ) असे या तरूणाचे नाव आहे. मेंगलोर एक्सप्रेसने मुंबई ते कणकवली असा प्रवास करताना ही घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मुणगे-सावंतवाडी येथील आत्माराम सावंत हा तरूण गेली सात वर्षे मुंबई- जोगेश्वरी येथे राहत असून मुंबईतील एका खासगी वाहनांवर चालक म्हणून तो काम करत होता. गणेशोत्सवानिमित्त शनिवारी (दि.१५) पहाटे मेंगलोर एक्सप्रेसने तो मुंबईतून कणकवलीला येत होता. रत्नागिरी-आरवली प्रवासादरम्यान रेल्वेतून तोल जाऊन खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. व मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. आत्मारामच्या मृत्यूमुळे मुणगे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT