यवतमाळ : कळंब येथून यवतमाळकडे जाताना दुचाकीमध्ये पदर अडकून अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वैशाली गुल्हाने यांना नागपूर येथे उपचारादरम्यान नेण्यात आले होते. यावेळी उपचार सुरु असताना गुरुवारी (दि.12) त्यांचा मृत्यू झाला. वैशाली राजेश गुल्हाने (४९, रा. हरणे ले-आऊट, रासा रोड, कळंब) असे अपघातात मृत्यू झालेल्या ग्रामसेविकेचे नाव आहे.
हा अपघात गुरुवारी (दि.12) सकाळी १० वाजताचे दरम्यान मडकोना घाटात झाला. वैशाली गुल्हाने या पोटगव्हाण येथे ग्रामसेविका म्हणून कार्यरत होत्या. महालक्ष्मी उत्सवासाठी त्या पतीसोबत दुचाकीवरून यवतमाळकडे निघाल्या होत्या. यवतमाळ रोडवरील मडकोना घाटात त्यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकामध्ये अडकला. त्यामुळे दुचाकीवरून दोघेही खाली कोसळले. या अपघातात वैशाली 'यांच्या डोक्याला जबर मार लागून त्या जखमी झाल्या. त्यांना यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. गुरुवारी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.