कोकण

रत्नागिरी: तळवडे येथे आईच्या पार्थिवाला मुलीने दिला मुखाग्नी

अविनाश सुतार

लांजा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील तळवडे गावातील आंबेकर वाडीतील वयोवृद्ध यमुना तानू आंबेकर हिचे आज (दि. १३) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना मुलगा नसल्याने मुलीने पुढाकार घेत आईचे अंत्यविधी पार पाडण्याचा निर्णय घेतला. वाडीतील सर्वच मंडळींनी पाठिंबा देऊन मुलीच्या या भूमिकेला सहकार्य केले.

यमुना आंबेकर यांना मुलगा नसून चार मुली आहेत. त्यांना हीरा, तारा, सरिता आणि नकुशा अशा चार मुली. मुलगा नसल्याने त्यांच्या वृद्धापकाळी त्यांची सेवा मुलीच करत होत्या. मुलींच्या लहानपणीच यमुनाबाई यांच्या पतीचे निधन झाल्याने आईनेच काबाडकष्ट मोलमजुरी करून मुलींना मोठे केले. त्यांची लग्न करून दिली. म्हणूनच आईच्या या कष्टाने उभ्या केलेल्या संसाराची जाण या सर्वच मुलींना होती. वडील अकाली गेल्याने आईनेच पित्याचे छत्र देऊन या मुलींना संभाळले. विषेशतः मोठी मुलगी हीरा आईला खुप चांगली सांभाळत होती. काळजी घेत होती.

वृद्धापकाळाने यमुना बाईंची तब्येत बिघडल्याने त्यांना तळवडे येथे घरी आणण्यात आले. आज सकाळी यमुना बाईंना देवाज्ञा झाली. अंत्यविधीसाठी मोठी मुलगी हीरा हीस विचारले असता तिने त्वरीत होकार दिला. वाडी, गावातील वयोवृद्ध, जाणकार यांच्या सल्ल्यानुसार धन पेरणे व अग्नी देणे, आदी सर्व अंत्यविधी संस्कार व सोपस्कार पार पाडले. अंत्ययात्रेसाठी गावातील भाऊबंद, वाडकरी, गावकरी आप्तेष्ट उपस्थित होते. पुरोगामी विचार प्रत्यक्षात उतरविल्याने हिरा यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT