नगर : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकले नाही, म्हणून आता सरकार काळजी घेऊन आरक्षणाबाबत निर्णय घेणार आहे. तसेच आगामी काळामध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठीही धोरणात्मक निर्णय होईल. त्यांनी आठ ते दहा हजार कोटी रुपयांच्या सवलतींच्या संदर्भात मागणी केली आहे. त्याचा सरकार विचार करत असल्याची ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
संबंधित बातम्या :
नगर शहरामध्ये भाजपच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. त्याला सर्वांनीच पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जनता त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका घेते. मात्र, त्यांचे आरक्षण देताना ते न्यायालयात टिकले नाही म्हणून आता या सर्व बाबींचा विचार करून पुढील निर्णय घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.