अहमदनगर

‘त्यांची’ नावे यादीतून वगळणार पी एम किसान योजना

अमृता चौगुले

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पीएम किसान योजनेंतर्गत प्रलंबित केवायसी व आधार सीडिंग सात सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा, अन्यथा त्यानंतरची प्रलंबित ई केवायसी व आधार सीडिंग ग्राह्य धरली जाणार नाही. पीएम किसान योजनेतून ही नावे रद्द करण्याची कार्यवाही करणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी दिली. पीएम किसान योजनेंतर्गत 2019-20 पासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ई केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंद अद्ययावत करणे, या बाबी केंद्र सरकारने अनिवार्य केल्या आहेत. त्यामुळे सरकारच्या सूचनेनुसार जे लाभार्थी ई केवायसी पूर्ण करणार नाहीत, तसेच बँक खाते आधार संलग्न करणार नाहीत, त्यांची नावे पीएम किसान योजनेतून वगळण्यात येणार आहेत.

ई केवायसीकरिता मे, जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांत कृषी विभागामार्फत मोहीम राबविण्यात आली होती. परंतु अद्याप तालुक्यात मोठ्या प्रमाणात ई-केवायसी प्रलंबित आहे. वारंवार संपर्क करूनही केवायसी व आधार सीडिंगसाठी प्रतिसाद मिळत नाही. अशा लाभार्थ्यांची नावे वगळण्यात येतील, तशा सूचना सरकार स्तरावरून देण्यात आल्या आहेत.

शेतकर्‍यांनी खरीप व रब्बी हंगामात बी-बियाणे व खते घेण्यासाठी आर्थिक मदत म्हणून सरकारकडून पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकर्‍यांना लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी शेतकर्‍यांना याचा मोठा फायदा झाला आहे. या अनुषंगाने पीएम किसान योजनेंतर्गत ही ई केवायसी व बँक खाते आधार संलग्नीकरण प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी ते आज करून घ्यावे, असे आवाहन म्हस्के यांनी केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT