औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : पुढील मुक्तिसंग्रामदिनापूर्वी दौलताबाद किल्ल्याचे नाव देवगिरी करणार असल्याची घोषणा कौशल्य, रोजगार उद्योजकता व पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. आगामी वर्षभरात ५ लाख युवक-युवतींना रोजगार देऊ असेही लोढा यांनी यावेळी सांगितले. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून औरंगाबाद येथे आयोजित महारोजगार मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी लोढा बोलत होते.
दरम्यान यावेळी १७ आणि १८ असे दोन दिवस आयोजित या मेळाव्यात ५ हजार युवकांना रोजगार देण्याचेही नियोजन असल्याचे लोढा यांनी सांगितले. औरंगाबाद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणावर आयोजित या मेळाव्याच्या उदघाटन कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विधानसभा सदस्य हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती होती. या रोजगार मेळाव्यामध्ये विविध आस्थापना, स्टर्टअपचे स्टॉल लावण्यात आले आहेत.
हेही वाचा :