पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई हे एक शहर इथल्या सणाची अनोखी कहाणी आणि झरीन खानचं (zareen khan) खास नातं आहे.मुंबईच्या शहराचा एक भाग असल्याने ती प्रत्येक सणाची उत्साहाने आतुरतेने वाट बघत असते. प्रत्येक मुंबईकरांप्रमाणे झरीन खानही या उत्सवाचा एक अनोखा भाग होते. (zareen khan)
झरीन खान या खास उत्सवा बद्दल म्हणते, "मुंबईचा एक भाग असल्याने कोणताही सण जवळ आला की एक वेगळा उत्साह जाणवतो आणि हा प्रत्येक सणवार साजरा करण्याची एक अनोखी उत्सुकता मला कायम असते. मुंबई हे एक शहर आहे जे कधीही झोपत नाही आणि हे एक शहर आहे जो प्रत्येक सणवार मोठ्या उत्साहात साजरा करतो. कधीही साजरा करणे थांबवत नाही. गणेश चतुर्थी हा एक असा उत्सव आहे जेव्हा शहराचा प्रत्येक कानाकोपरा भक्ती आणि उत्सवाने जिवंत होतो. मुंबई चा गणेश उत्सव हा नेहमीच उत्साहवर्धक असतो. या सणाची अनोखी ऊर्जा एक सकारात्मक वातावरण निर्माण करणारी असते आणि हेच खूप मनाला भावणारं आहे. सणांमध्ये लोकांना एकत्र आणण्याची एक अनोखी ताकद आहे. गणेश चतुर्थी अवघ्या एका दिवसावर आली असून हा उत्साह वाढत चालला आहे."