पुणे : पुढारी वृत्तसेवा – विदर्भ-मराठवाड्यात सुटलेले गार वारे, पाऊस अन् गारपिटीने कमाल -तापमान दोन अंशांनी घसरले आहे. आज मंगळवार (दि. १९) व बुधवारी (दि. 5२०) असे दोन दिवस या भागात पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य, उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसाचा अंदाज कमी असल्याने त्या भागात कमाल तापमानात फारशी वाढ नसली, तरी उष्मा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दक्षिण तामिळनाडू ते पश्चिम विदर्भापर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे विदर्भ-मराठवाडा या भागात २१ गमार्चपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस अन् गारपिटीची शक्यता आहे. श्रीविदर्भातील काही भागांत गारपीट अन् हलक्या पावसामुळे कमाल तापमानात घसरण झाली. या भागात अजून दोन ते प्रतीन दिवस असेच वातावरण राहणार आहे. सोमवारी मध्य महाराष्ट्रातील काही भागांत सायंकाळी ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
हेही वाचा