पुढारी ऑनलाईन डेस्क : ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला मतदान करण्यापेक्षा भाजपला मतदान करणे चांगले आहे., असे धक्कादायक विधान काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मंगळवारी ( दि. ३० एप्रिल) एक प्रचार सभेत बाेलताना केले. त्याच्या या विधानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी आपण अधीर रंजन चौधरी यांनी व्हिडिओ पाहिला नसल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे मौन बाळगणे पसंद केले आहे.
पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि बहरामपूर लोकसभा उमेदवार अधीर रंजन चौधरी प्रचार सभेत मातृभाषा बंगालीमध्ये बोलताना म्हणाले की, ही निवडणूक देशाचे भविष्य ठरवणारी आहे. लोकांना धर्मनिरपेक्ष शक्तींना मतदान करावे. काँग्रेस आणि डाव्यांना जिंकणे आवश्यक आहे. तसे न केल्यास धर्मनिरपेक्षता धोक्यात येईल. टीएमसीला मतदान करणे म्हणजे भाजपला मत देणे, त्यामुळे भाजपलाच मतदान करणे चांगले," असे चौधरी बंगालीमध्ये भाषण करताना म्हणाले.
अधीर रंजन यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, "मी व्हिडिओ पाहिला नाही आणि त्यांनी हे कोणत्या संदर्भात बोलले आहे हे माहित नाही; परंतु मला हे स्पष्ट करायचे आहे की, काँग्रेस पक्षाचे फक्त एक उद्दिष्ट आहे ते म्हणजे 2019 मध्ये भाजपला मिळालेल्या जागांची संख्या कमी करणे".
डावे पक्ष आणि काँग्रेस इंडिया आघाडीमध्ये आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही टीएमसी युतीचा भाग असल्याचे सांगितले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जागावाटप नाही.
भाजपने बंगालच्या प्रतिकांचा वारंवार अपमान केला आहे. फक्त पश्चिम बंगाल विरोधीचभाजपचा प्रचार करू शकतात. पश्चिम बंगालमध्ये अधीर रंजन चौधरी हे भाजपचे बी टीम म्हणून काम करत आहेत. बी-टीमचे सदस्य उघडपणे लोकांना भाजपला मतदान करण्यास सांगत आहेत, 13 मे रोजी बहरामपूरचे लोक या विश्वासघाताला चोख प्रत्युत्तर देतील, असे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसने दिले आहे.
हेही वाचा :