पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात मोहाली येथे आजपासून पहिली कसोटी सुरु आहे. या कसोटी सामन्यात कोहलीने ८ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. ही कामगिरी त्याने १०० व्या कसोटी सामन्यात केली. ही कामगिरी करणारा विराट सहावा फलंदाज ठरला आहे.
याआधी भारताचे माजी कसोटीपटू सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग यांनी ८ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. आता यांच्या पंगतीत विराट जाऊन बसला आहे. हा सामना खेळण्यापूर्वी ८ हजार धावा पूर्ण करण्यासाठी विराटला (Virat Kohli) अवघ्या ३८ धावांची आवश्यकता होती. तो ४५ धावा करुन बाद झाला आहे.
श्रीलंकेविरुद्ध सुरू झालेला पहिला कसोटी सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी ऐतिहासिक आहे. कारण विराट कोहली त्याचा कसोटी कारकिर्दीमधील 100 वा कसोटी सामना आज खेळला. या सामन्यापूर्वी विराट कोहलीचा एक इमोशनल व्हिडीओ व्हायरल झाला होता. 100 कसोटी सामने खेळेन, असे कधी वाटले नव्हते, असे विराट कोहलीने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ