Latest

ठाणे : तानसा व मोडक सागर धरण ओसंडून वाहण्याच्या मार्गावर; गावांना सतर्कतेचा इशारा

अनुराधा कोरवी

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे जिल्ह्यातील तानसा व मोडक सागर धरणाच्या परिसरात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे ही दोन्ही धरणे लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरणांच्या तसेच तानसा व वैतरणा नदीच्या परिसराच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत बृहन्मुंबई महानगरपालिकेची तानसा व मोडक सागर ही दोन धरणे आहेत. तानसा व मोडक सागर धरण ओसंडून वाहण्याची पाताळी ही १२८.६३ मीटर व १६३.१४ टीएचडी इतकी आहे. आज तानसा व मोडक सागर धरणातील पाण्याची पातळी ही १२५.३३ मीटर व १६१.३३ मीटर इतकी झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे ही पाणी पातळी पुढील काही दिवसात वाढणार असून ही दोन्ही धरणे ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. यामुळे या दोन्ही धरणाखालील तसेच तानसा व वैतरणा नदीलगतच्या शहापूर, भिवंडी, वाडा, वसई व पालघर या तालुक्यातील गावांना व तेथील ग्रामस्थांनी सावध रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या परिसरातील शासकीय यंत्रणांना सतर्क करण्यात आले असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT