पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याचे राजकीय वातावरण विचित्र आहे. भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली. आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना लगावला आहे. एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. (Uddhav Thackeray on Ajit Pawar)
उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या विचारसरणीने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही. ती विचारसरणी आज सत्तेत आहे. इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लादली. मात्र, त्यांच्याविरोधात आवाज उठवता येत होता. मात्र, आता विरोधात बोलले की, तोंड बंद केले जाते. कोरोना काळात मुंबईत भ्रष्टाचार झाला का यावर नक्की बोलू. मात्र, पी एम केअर फंडातील पैशांचे काय झाले? कोरोना काळातील भ्रष्टाचार बाहेर काढायला हवा. (Uddhav Thackeray on Ajit Pawar)