Latest

पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातो : उद्धव ठाकरेंचा निशाणा

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पक्ष फोडाफोडी हे काही नवीन नाही पण पूर्वी पक्ष फोडला जायचा आता पक्ष पळवला जात आहे. हा पायंडा महाराष्ट्रासाठी वाईट आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्या बंडावर केली आहे. उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी यवतमाळ येथून दौऱ्याला सुरूवात केली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यवतमाळ येथे उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम पोहरादेवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना पाठवलेल्या नोटीसबाबत बोलताना म्हणाले की, "सुप्रिम कोर्टाने आमदारांबाबत स्पष्ट शब्दात निकाल दिला आहे. त्या चौकटीमध्येच अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. चौकटीच्या बाहेर निर्णय घेतला तर लोकशाहीला धरून असणार नाही. तसा निर्णय घेतला तर आम्हाला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडे आहेत," असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिला आहे.

"भाजप आता काहीही बोलण्याचा लायकीचा राहिलेला नाही. भाजपने कोणावरही दोषारोप करणे सोडून द्यावे त्यांच्या घरात जे शिरत आहेत त्यांच्याकडे पाहवं. शिवसेना आणि भाजपमध्ये अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता हे सत्य आहे. ठरल्याप्रमाणे झालं असत तर आज जी परिस्थिती आहे ती नसती. आज भाजपचा कार्यकर्ता बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची देखभाल करण्यातच रमला आहे," अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी अजित पवार यांच्या बंडावर केली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT