पुढारी ऑनलाईन डेस्क : The Kapil Sharma Show मध्ये आपल्या कॉमेडीचा जलवा दाखवलेला ज्युनियर कलाकार तीर्थानंदने (The Kapil Sharma Show) जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपूर्वी फेसबूकवर लाईव्ह जाऊन आपण जग सोडून जात असल्याचे सांगतात सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला. पण, सुदैवाने तीर्थानंदचा जीव वाचला. एका वृत्तवाहिनीशी केलेल्या बातचीतमध्ये तो काय म्हणाला पाहा.
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये ज्युनियर नाना पाटेकर नावाने प्रसिद्ध असलेले तीर्थानंद राव मागील काही दिवसांपासून फेसबूकवर लाईव्ह जाऊन सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, पोलिसांनी तीर्थानंदचा जीव वाचवला. त्याच्यावर आता उपचार सुरू आहे. (The Kapil Sharma Show)
तीर्थानंद म्हणाला, खरंच मला जगायचं नाही. त्या महिलेने इतकं टॉर्चर केलं आहे की, मी कंटाळलोय. जर पोलिस वेळेत पोहोचली नसते तर कदाचित मी आता तुमच्यासमोर बोलताना दिसलो नसतो. जेव्हा पोलिसांनी त्याच्या गर्लफ्रेंडला कॉल करून रुग्णालयात बोलावण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली, त्याला मरू द्या, तसं तर मी त्याला सोडणारचं होते. असे सांगून तिने फोन कट केला.
तीर्थानंद पुढे म्हणाला, मी त्या महिलेमुळे आपल्याच घरातून बाहेर पडलोय. मी अनेक दिवस बेघर होतो. जवळपास १० ते १२ दिवस मी
फुटपाथवर रात्र काढलीय. तिने माझ्यावर खोटी केस घातलीय. मी सातत्याने तिला सांगत आलो की, केस मागे घे आणि माझा पिच्छा सोड. पण ती तयार नाही. तिला माझ्या घरातल हिस्सा हवा आहे. ती पैशांची डिमांड करत आहे. तिला मी जवळपास लाख रुपयांचा फोन खरेदी करून दिलाय. त्यामुळे माझा पिच्छा सुटेल. पण ती तयार नाही.
तीर्थानंदच्या प्रकृतीत सुधारणा होतेय. अद्याप तो रुग्णालयात आहे. तीर्थानंदने सांगितलं की, माझ्यावर आणखी तीन ते चार दिवस उपचार सुरु असमार आहेत. अद्याप काही टेस्ट करायच्या आहेत. शरीरात विष गेलं होतं. मी केलेल्या या प्रकारामुळे मला खंत वाटते. पण, माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. त्या महिलेने माझ्या विरोधातील सर्व केस परत घ्यावे, आणि यातून माझी सुटका करावी. तिच्यामुळे मी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करू शकत नाही. माझे सर्व पैसे संपले आहेत.