पुढारी ऑनलाईन डेस्क :
मुंबईतील 'श्रीजी' होम्स कंपनीमध्ये ८९ टक्के शेअर्स हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे आहेत. तसेच रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर त्यांचे १० टक्के शेअर्स असल्याचा आरोप आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.
नाशिक येथील पत्रकार परिषदेत बाेलताना किरीट सोमय्या म्हणाले, "कंपनीची नोंदणी झालेली नसतानाही कार्यरत असणाऱ्या श्रीजी कंपनीमध्ये कंपन्यांचे जाळे करून मुख्यमंत्री जनतेला फसवत आहेत, याचा हिशोब त्यांना द्यावा लागेल".
सचिन वाझे माफीचे साक्षीदार असतील तर ठाकरेंवर कारवाई होणार ? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांना भीती वाटतेय, त्यांना झोप येत नाहीय' असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा :