Latest

सुख म्हणजे नक्की काय असतं: गौरी कधीचं आई होऊ शकणार नाही?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

छोट्या पदड्यावरील मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं एका नव्या वळणावर येवून ठेपलं आहे. मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.  मालिकेत गौरीविषयी (गिरीजा प्रभू) वाईट प्रसंग मालिकेत पाहायला मिळत आहे. तिच्या आयुष्यात वादळ आलं आहे. ज्यामुळे गौरी खूप दु:खी आहे.

गौरी आणि जयदीपची जोडी सर्वांचीच आवडती आहे. दरम्यान, सर्व काही सुरळीत सुरू असताना मात्र डॉक्टर गौरीला ती कधीच आई होऊ शकणार नाही, असे सांगतात. ही गोष्ट ती घरामध्ये जयदीपला सांगते. या गोष्टीमुळे जयदीपदखील खूप चिंतेत पडतो. दरम्यान, शालिनी आणि देवकी दोघी या कुटुंबामध्ये भांडणं लावायची कामे कराना दिसताहेत. शालिनी ही देवकीला गौरी विरोधात काय बोलायचे हे सांगते. त्याप्रमाणे देवकी जयदीपला सुनावते. गौरी कधीच आई होऊ शकणार नाही, हे समजल्यानंतर देवकी जयदीपला सुनावते. देवकी म्हणते- जयदीपने ज्योतीसोबत लग्न केले असते तर बरे झाले असते. यानंतर ती देवकी गौरीलाही ऐकवते.

दरम्यान, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचा प्रोमोसमोर आलाय. यामध्ये गौरी मानसीला सांगताना दिसते आहे की, मी ठरवलं आहे की जयदीपला दुसरं लग्न करायला लावायचे. गौरी जयदीपसाठी मुलगी शोधायला सुरूवात करते. जयदीपच्या निदर्शनास दिसते की, त्याच्या नावाचं प्रोफाईल ऑनलाईन सुरू आहे. जयदीप गौरीला म्हणतो की, हे काय करते आहेस. यावर गौरी म्हणते की, हे तू याआधी माझ्यासाठी केलं आहेस. जयदीप तू दुसरं लग्न कर. तू अशा मुलीशी लग्न कर जी तुला बाप बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकेल. हे ऐकून जयदीपला धक्का बसतो. तो चिंतेत पडतो. आता संपूर्ण कुटुंबीयांकडून यावर काय प्रतिक्रिया येतात. जयदीप गौरीला समजवेल की, तो खरंच लग्न करेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT