सांगली : पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील शेवटचे स्वातंत्र्य सैनिक माधवराव भुजंगराव माने यांचे बुधवारी (दि.२१) पहाटे शंभराव्या वर्षी निधन झाले. माधवराव माने यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यातील शेवटचे स्वातंत्र्य सैनिक हरपले आहेत.
१२ जुलै १९२४ रोजी माधवराव माने यांचा जन्म झाला होता. सुरुवातीपासूनच माधराव माने हे चळवळीमध्ये सक्रिय होते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. तासगावमध्ये असणाऱ्या कचेरीवरील युनियन जॅक हटवण्यामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य होते. जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांपैकी माधवराव माने हे शेवटचे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या निधनाने आता स्वातंत्र्य सैनिकांपैकी शेवटचा तारा देखील निखळला आहे.
हेही वाचा :