Latest

सांगली : जतहून कुंभारीला जाणाऱ्या मोटरसायकलचा अपघात तिघे ठार ; एक जखमी

backup backup

जत ; पुढारी वृत्तसेवा : कोसारी (ता. जत) येथील चौघेजण मित्र एकाच मोटरसायकलवरून जत हून कोसारीकडे जात असताना अपघात झाला आहे. या अपघातात तिघे ठार झाले. ही घटना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विजापुर गुहागर राष्ट्रीय महामार्ग वरील बिरनाळ ओढ्याजवळ घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेत अजित नेताजी भोसले (वय .२२),मोहित शिवाजी तोरवे (वय.२१),राजेंद्र भाले (वय.२२) हे तिघे ठार झाले आहे. तर संग्राम विक्रम तोरवे (वय.१६) हा जखमी झाला आसून ग्रामीण रुग्णालय जत येथे उपचार घेत आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोसारी येथील अजित भोसले व त्यांचे मित्र हे शनिवारी जतला गेले होते. रात्री उशिरा होऊन गावाकडे परतत होते. दरम्यान,बिरनाळ नजीक असणाऱ्या या पत्रात मोटरसायकल वरील ताबा सुटल्याने अपघात झाला.

एकाच मोटरसायकलवर चौघे जण प्रवास करत होते. यातील अजित भोसले हा जागीच ठार झाला. मोहित तोरवे,राजेंद्र भाले , संग्राम तोरवे या तिघांना बिरनाळ येथील लोकांनी गाडीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यात गंभीर जखम झाल्यामुळे मोहित तोरवे ,राजेंद्र भाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संग्राम याच्यावर सद्यस्थितीत उपचार सुरू आहेत. घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT