नागपूर: पुढारी वृत्तसेवा: वाढते अपघात आणि यातील मृत्यूसाठी बसगाड्यांचा दर्जा देखील जबाबदार असल्याचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर आता बसगाड्यांच्या बांधणीचा दर्जा व गुणवत्ता राखण्यासाठी सुधारित मानके निश्चित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
नव्या मानकांमुळे देशातील बसगाड्यांची गुणवत्ता व प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ होईल. देशात बस अपघातांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भारतातील बस बांधणीचा दर्जा वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने बस बांधणीची सुधारित मानके मंजूर केली असल्याचे गडकरी यांनी नमूद केले आहे. हे पाऊल भारतातील बसेसच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा करण्याचा मार्ग मोकळा करेल, ज्यामध्ये आकस्मिक परिस्थितीत प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यावर प्राथमिक लक्ष केंद्रित केले जाईल, असेही गडकरी (Nitin Gadkari) यांनी यात नमूद केले आहे.
हेही वाचा