पुढारी ऑनलाइन डेस्क : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावर झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
राज ठाकरे यांनी आज सोमवारी फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. नेमक्या कोणत्या कारणासाठी राज ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यांच्यात काय चर्चा सुरू आहे. या विषयी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे.
राज ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच मोठी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये तब्बल एक ते दीड तास काय चर्चा झाली हाेती. त्यानंतर मनसे पदाधिका-यांच्या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली हाेती. या सर्व एकूण पार्श्वभूमीवर आजच्या भेटीत नेमके काय घडले काय चर्चा घडली. भविष्यात राज ठाकरे हे भाजपसोबत जातील का? अशा अनेक प्रश्नांवर चर्चा रंगल्या आहेत.
हे ही वाचा: