Latest

मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, मात्र पुण्याला वेळ लागणार नाही : राज ठाकरे

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, मात्र पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. तरूणाईचा कल विदेशाकडे वाढत चालला आहे. प्रचंड वेगाने बांधकाम होतं असल्याने प्रदूषणामध्ये वाढ होत चालली आहे. अशी स्पष्ट भूमिका मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मंडळी आहे. ते पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते.

पुणे शहराच्या नियोजनावर ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर चांगलीच तोफ डागली. ते म्हणाले, महापालिकेमध्ये शहर नियोजनाचा विचार केला जात नाही. सरकारमध्ये आर्किटेक्टला कमी आणि महापालिकेतील इंजिनिअरला जास्त महत्व दिलं जातं. त्यामुळे शहरं बकाल पडली आहेत. माझ्या हातात सत्ता आल्यास आर्किटेक लोकांच्या हातात राज्य देतो. आपण वेगळा विचार करत असतो. आणि जे सत्तेत बसलेत ते वेगळा विचार करत आहेत. असे म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर टीकास्र सोडलं.

संत गाडगेबाबा यांच्या राज्यात स्वच्छता शिकवावी लागते यापेक्षा मोठं दुर्देव नाही. वांद्रे वरळी सीलिंक बांधायला रामायणा इतका वेळ लागला ही पहा आपल्या सरकारची गती, मुंबई दर्शन सहलीत ब्रिटिश काळातल्या वस्तू दाखवल्या जातात. असेही ठाकरे म्हणाले. लोकसंख्येनुसार पुण्यात १५ टक्के रस्ते व्हायला हवेत, शहरात आता ७ ते ८ टक्के रस्ते झाले आहेत. सरकारजवळचा पैसा वाटेल तसा वापरला जात असून लोकांचा प्रतिनिधिंशी काही संबंध येत नाही. त्यांना शहरात राहण्यासाठी फक्त समाधान लागतं.

सर्किट हाऊसमध्ये काय पळत पळत आंघोळ करायची का?

यावेळी बोलताना राज ठाकरेंनी बीडच्या सर्किट हाऊसचं उदाहरण देत, म्हणाले अनेक गेस्ट हाऊसमध्ये भली भली मोठी बाथरूम असतात. तिथे काय पळत पळत जाऊन आंघोळ करायची का ? असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला.

हेही वावा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT