पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ICC कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जूनपासून खेळवला जाणार आहे. हा सामन्यासाठी दोन्ही संघ इंग्लंडच्या ओव्हलमध्ये भिडणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. २०१९-१०२१ च्या हंगामात न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला होता. (WTC FInal 2023)
भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये असून, या महत्त्वाच्या सामन्याच्या तयारीवर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाही अंतिम फेरीसाठी आवश्यक तयारी करत आहे. लंडनमधील ओव्हल येथे ७ ते ११ जून दरम्यान होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होईल. ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथने भाकित केले आहे की, ओव्हलची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असेल. सामना जसजसा पुढे जाईल तशी खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल ठरेल. (WTC FInal 2023)
Accuweather च्या अहवालानुसार, सामन्याच्या पहिल्या चार दिवशी हवामान पूर्णपणे स्वच्छ असेल. मात्र, सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाची ५६ टक्के शक्यता आहे. अशा स्थितीत सामन्याच्या निकालावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आता प्रश्न पडतो की, कसोटीच्या पाचव्या दिवशी पाऊस पडला तर? आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे का? सामना अनिर्णित राहिला तर कोणता संघ चॅम्पियन होईल?
पावसामुळे एक किंवा दोन तासांचा खेळ वाया गेल्यास पंच त्याच दिवशी त्याची भरपाई करू शकतात. त्याचवेळी, सामन्याच्या कोणत्याही दिवशी पाऊस पडल्यास, पंचांकडे अतिरिक्त दिवस २३ जून असेल. पावसामुळे एक दिवस वाया गेला तर सामना राखीव दिवशी खेळवला जाईल.
सामना अनिर्णित किंवा बरोबरीत सुटल्यास, दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जाॅश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
राखीव खेळाडू : मिचेल मार्श, मॅथ्यू रेनशॉ.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, उमेश यादव.
राखीव खेळाडू : यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.
हेही वाचा;