कागल ; पुढारी वृत्तसेवा कागल शहर आणि परिसरामध्ये मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात परतीचा पावसाला सकाळपासून सुरूवात झाली आहे. या पावसामुळे शेतीच्या कामाला ब्रेक लागला आहे. ऊस तोडणीला देखील ब्रेक लागला आहे. या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे.
आज (बुधवार) पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. आठ वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांचे हाल होत आहेत. माळावरती झोपड्या बांधून राहिलेल्या मजुरांना या अचानक सुरू झालेल्या पावसामुळे त्रास सहन करावा लागला.
या पावसामुळे उसाच्या लागणीवरही परिणाम झाला आहे, तसेच उसाच्या तोडणीची कामे खोळंबणार आहेत. काही ठिकाणी भात पीक काढण्याचे काम सुरू आहे. भाताचेही नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाताचे पिंजर भिजून नुकसान होत आहे.
हेही वाचा :