पुढारी ऑनलाईन डेस्क : नेहमी चर्चेत राहणारे मध्य प्रदेशमधील खासदार साक्षी महाराज ( Sakshi Maharaj ) हे वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जर जमावाने तुमच्या घरावर हल्ला केला तर पोलिस तुमचे संरक्षण करु शकत नाही. त्यामुळे स्वरक्षणासाठी घरात कोल्ड्रिंगच्या बाटल्या अणि बाण ठेवा, असे आवाहन त्यांनी फेसबूकच्या माध्यमातून समर्थकांना केले आहे. त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.
त्यांनी फेसबूकवर म्हटलं आहे की, जर एखादा जमाव अचानक रस्त्यावर, शेजारच्या घरी व तुमच्या घरावर चाल करुन आला तर तुमचे पोलिस संरक्षण करु शकणार नाहीत. तुम्ही या जमावाच्या स्वागतासाठी घरात दोन बॉक्स भरलेले कोंड्रिक्सच्या रिकाम्या बाटल्या आणि बाण तयार ठेवा. या पोस्टबरोबर त्यांनी जमावाचा एक फोटोही शेअर केला आहे. जमावाने तुमच्या शेजारी व तुमच्यावर हल्ला केला तर पोलिस तुमचे संरक्षण करण्यासाठी येणार नाही. जमाव तुमच्यावर हल्ला करुन निघून जाईल. त्यानंतर पोलिस काठ्या घेवून तपासासाठी येतील. तोपर्यंत सर्व काही संपलेले असेल, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा :
पाहा व्हिडीओ :