पुढारी ऑनलाईन: पिंपरी चिंचवड शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित आणि येणाऱ्या नागरिकांना 'ओआरएस'ची पाकिटे दिली जात असल्याने नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या कोणत्याही राजकीय किंवा शासकीय कार्यक्रमात उपस्थित नागरिकांची एवढी काळजी घेण्यात आलेली नव्हती. अडीच वाजता सुरू होणारा कार्यक्रम हा एक तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेला तरी सुरु झाला नव्हता.
पिंपरी-चिंचवड शहरात शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला येणाऱ्या आणि उपस्थिती लावणाऱ्या नागरिकांची विशेष काळजी घेण्यात येत असून त्यांना 'ओआरएस'ची पाकिटे देण्यात येत आहे. अशा प्रकारे नागरिकांची कधीच एवढी काळजी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये चर्चेला एकच उधाण आले आहे.
मुळात दुपारी अडीच वाजता असलेला कार्यक्रम साडेतीन वाजले तरी सुरू झालेला नव्हता. उन्हामुळे नागरिकांना चक्कर येऊ शकते, याची खबरदारी घेऊन 'ओआरएस'चे वाटप तर होत नाही ना असा प्रश्न विचारला जातो आहे. अशीच काळजी प्रत्येक पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांची घेतली, तर ती नक्कीच कौतुकास्पद बाब असेल यात मात्र शंका नाही.
हेही वाचा: