Latest

मतं मागण्यासाठी सभेत जाऊन रडलेले पंतप्रधान कधी पाहिले नाहीत : संजय राऊतांची टीका

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाई डेस्क : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल, असा दावा केला आहे. यावर प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी "पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल" असे म्हटले आहे. देशात राज्य करणाऱ्यांवर लोकशाही मार्गाने टीका केली, आजपर्यंत अनेक पंतप्रधानांनी अशी टीका सहन केल्या आहेत. पण मतं मागण्यासाठी सभेत जाऊन रडलेले पंतप्रधान कधी पाहिले नाहीत, अशी टीकाही राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऊर्जादायी आहे. काल रात्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारक येथे अभिवादन केले. आज महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा आयोजित केली आहे, ती फक्त महाराष्ट्राच्या हितासाठी आयोजित केली आहे. देशात संविधान राहीलेलचं नाही. संविधानाचे निर्माते महाराष्ट्राचे पण संविधानाची सर्वात जास्त पायमल्ली महाराष्ट्रात होत आहे. मन की बात'वर प्रेम आहे तेवढ संविधानावर असतं तर देशात अशी परिस्थीती आली नसती. पैशांच्या जोरावर श्रीसेवकांचे मृत्यू प्रकरण दडपण्यात आलं. दिल्लीत बसलेल्यांना मुंबई वेगळी करायची आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळ करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जात आहे. पण आमच्या रक्ताने बनलेला हा महाराष्ट्र आहे. यासाठी पुन्हा एकदा प्राण देण्याची आमची तयारी आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT