पुढारी ऑनलाईन डेस्क : नवी मुंबई मधील विमानतळाची आज (दि.७) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली.
यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, २०२४ पर्यंत हे विमानतळ सुरु होईल. या विमानताळाचे कामकाज वेगाने सुरु आहे. हे विमानतळ मुंबई आणि पुण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मुंबई विमानतळावरील भार कमी होईल. जवळजवळ ९ कोटी प्रवासी या विमानतळाचा वापर करु शकतात. पहिल्या टप्प्याचे काम पुढील वर्षी होईल. वेळेच्या अगोदर विमानतळाचं कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. असेही शिंदे म्हणाले.
हेही वाचा