Latest

नाशिक : कांदाप्रश्नावर राष्ट्रवादी आक्रमक, मुंबई आग्रा महामार्ग अडवला

गणेश सोनवणे

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा 

कांदा कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. भाजप सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करून कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी आज शुक्रवार (दि. १०) चांदवड येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीने आंदोलन छेडले आहे.

समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला आहे. यामुळे महामार्ग ठप्प झाला आहे. शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

हेेही वाचा :

SCROLL FOR NEXT