Latest

नाशिक : चांदवडलाही अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना फटका

अंजली राऊत

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष, कांदा, टोमॅटो पिकांना बसणार आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडला आहे. कांदा, द्राक्ष पिकांना कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही आहे, अशात अवकाळी पावसाने दस्तक देत शेतकऱ्यांच्या दुःखात विरजण टाकीत हजेरी लावल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अस्मानी संकटाला सामोरे जाताना सरकारने मदत करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT