कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर महानगरपालिकेत ३५-३५ लाख एका नगरसेवकाला वाटल्याचा गौप्यस्फोट आमदार विनय कोरे यांनी केला. यावर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान यावर ईडीची चौकशी लावण्याची ही एका संघटनेने मागणी केली आहे. यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकारांशी बोलताना ३५ लाखांबाबत खुलासा केला. (mushrif and kore)
महापालिकेत विनय कोरे यांच्यासोबत मी होतो पण पैसे देताना मी नव्हतो, त्यांच्या बोलण्याचा उद्देश वेगळा होता. तो चुकीच्या पद्धतीने घेतला गेला, घोडेबाजार थांबविण्यासाठी कोर यांनी पुढाकार घेतला होता. त्याची आठवण त्यांनी सांगितली त्याला महत्त्व देण्याची आवश्यकता नसल्याचे म्हणत मंत्री मुश्रीफ म्हणाले.
यापार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खुलासा केला. महापालिकेच्या राजकारणात विनय कोरे यांच्यासोबत राजकारण केले. मात्र, पैसे दिल्याची कबुली कोरे यांनी दिली असली तरी त्यावेळी मी उपस्थित नव्हतो.
विनय कोरे यांनी अत्यंत स्पष्टपणे अशाप्रकारच्या घोडेबाजाराला लगाम बसावी यासाठी विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मध्यस्थी केल्याचे म्हटले होते. मात्र, कोरे यांच्या वक्तव्याचा विपर्यास्त केला आहे. ते विधानपरिषद निवडणुकीच्या संदर्भाने बोलले होते, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर शहराचा महापौर आपल्या पक्षाचा असावा, यासाठी त्यावेळी नगरसेवकांना ३५-३५ लाख रुपये दिले.
ईर्ष्येच्या राजकारणात भावनिक होऊन तो घेतलेला एक चुकीचा निर्णय होता, अशी कबुली आमदार विनय कोरे यांनी दिली.
आता पुन्हा तीच चूक करायची काय? सर्वसामान्यांना राजकारणाबद्दल आदर कमी होऊ नये तसेच कार्यकर्त्यांची राजकीय ईर्ष्या कमी करण्यासाठी जिल्ह्यातील निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न असल्याचे कोरे म्हणाले.
गोकुळ दूध संघात सत्तांतर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर जिल्हा परिषदेच्या राजकारणातही आ. कोरे यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या टोकाच्या, ईर्ष्येच्या राजकारणात पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांची निवडणूक बिनविरोध करण्यात आ. कोरे यांनी समन्वयकाची यशस्वी भूमिका बजावली होती.
आता जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात आ. कोरे हेच केंद्रबिंदू आहेत.
दरम्यान, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आवाडे, महाडिक, यड्रावकर, राजू शेट्टी, हाळवणकर गटाला एकाच व्यासपीठावर आणत बिनविरोध करण्याचा प्रयत्न आ. कोरे करत आहेत.
या पार्श्वभूमीवर महापालिकेत पंधरा वर्षांपूर्वी ईर्ष्येच्या राजकारणाचे गाठलेले टोक ही आपली चूक होती, अशी प्रामाणिक कबुली देत आ. विनय कोरे म्हणाले, त्यावेळी महापालिकेच्या राजकारणात हसन मुश्रीफ आणि आम्ही एकत्र होतो.
तर दुसर्या बाजूला सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक होते.
टोकाचे राजकारण केले. माझा महापौर करण्यासाठी नगरसेवकांना 35-35 लाख रुपये दिले.
आमचा महापौर झाल्यानंतर बरे वाटले; परंतु लोकांचा माझ्याकडे बघण्याचा द़ृष्टिकोन बदलू लागला. त्यावेळी केलेली ती चूक मी मान्य करतो.
भावनेच्या भरात केलेली ती चूक होती.