पुणे : राज्यात पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, याच भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात मुसळधार पाऊस पडण्यासाठी कोणतीही स्थिती नाही. केवळ दक्षिण ओडिशावर हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे.
त्यामुळे दुष्काळस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यातील रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट वर्तविला आहे.
हेही वाचा