Latest

औरंगाबाद : नाथसागर धरणामध्ये ९३ हजार ३७९ क्युसेक पाण्याची मोठी आवक

मोनिका क्षीरसागर

पैठण; चंद्रकांत अंबिलवादे : पैठण जायकवाडी येथील नाथसागर धरणाच्या पाणीलोट क्षेत्रातील वरील भागातील प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे. बुधवारी (दि.१३) दुपारी बारा वाजेपर्यंत ९३ हजार ३७९ क्युसेक पाण्याची आवक येथील धरणात झाली आहे. सध्या या धरणात ९९४.४८५ पाणीसाठा आहे त्यामुळे नाथसागर धरणाची टक्केवारी ४५.८१ नोंद नियंत्रण कक्षात झाल्याची माहिती धरण ऑपरेटर गणेश खराडकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे.

गेल्या चार दिवसांपासून पैठण तालुक्यातील विविध गावांमध्ये पावसामुळे सूर्यदर्शन झालेले नाही. जायकवाडी नाथसागर धरणाच्या पाणी लोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या वरील भागातील छोट्या मोठे धरण व प्रकल्पातून मंगळवारी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. येथील नाथसागर धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. धरणात पाण्याची आवक जमा होत असल्याची नोंद धरण नियंत्रण कक्षात ठेवण्यात आली आहे. त्यानुसार ९३ हजार ३७९ क्युसेक पाण्याची आवक या धरणात झाली आहे. सध्या या धरणातील पाण्याची ४५ .८१ टक्के नोंद झाली आहे.

या सतत पडत असलेल्या पावसामुळे पैठण तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी यांचे जाणे येणे विस्कळीत झाले आहे. नाथसागर धरणावरील भागात पावसाने उघड दिल्यास या ठिकाणी येणाऱ्या पाण्याची आवक कमी होण्याची शक्यता धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT