कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात गेले काही दिवस सुरु असेलेली पावसाची संततधार आज (दि. २९) कमी झाली. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होत आहे. त्याचबरोबर पाण्याखाली असलेले बंधाऱ्यांची संख्या देखील ५३ इतकी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Kolhapur Rain Update)
आज सकाळी (दि. २९) राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे देखील बंद झालेले होते. त्यानंतर आता दुपारी २:00 वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४१.३ इतकी होती. गेल्या अठवडाभरापासून सुुरु असलेल्या पावसामुळे एकूण ८२ बंधारे पाण्याखाली होते. आता हळूहळू पाणी ओसरत असल्याने बंधारे खुले होत आहेत. सध्या एकूण ५३ बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. (Kolhapur Rain Update)
हेही वाचा