पुढारी ऑनलाइन डेस्क : #KarnatakaElection: कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले असून काँग्रेसचा विजय आता निश्चित झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकांना फोडाफोडी आणि खोक्याचं राजकारण आवडलं नाही. त्यामुळेच जनतेने आपल्या मतातून अशा प्रकारचे राजकारण चालणार नाही, हे दाखवून दिले आहे. तसेच कर्नाटकचा निकाल ही तर लोकशाहीतील परिवर्तनाची नांदी आहे, दक्षिणेतील सत्ता भाजपने गमावली आहे, असे शदर पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी ते म्हणाले की, देशात चुकीचे राजकारण करत होते त्यांना देशातील जनतेने एक प्रकारचा धडा शिकवला आहे. लोकांनी एवढी काळजी घेतली आहे की फोडाफोडीची राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर बहुमतात अंतर जास्त ठेवायला हवे. हे जनतेने मतातून सिद्ध केले आहे. त्यामुळेच काँग्रेस हे भाजपपेक्षा दुप्पट संख्येंने पुढे आहे. भाजच्या पारड्यात केवळ 64 जागा आणि काँग्रेसला 134 जागा मिळत आहेत. जागेचे हे अंतर पाहता जनतेने त्यांचे मत स्पष्ट केले आहे.
भाजपच्या पराभवाची कारणे सांगताना शरद पवार म्हणाले की सत्तेचा गैरवापर करणे, साधनांचा गैरवापर करणे याचा फटका भाजपला बसला आहे. तसेच आज देशात भाजपची सत्ता, कर्नाटकसह, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, राजस्थान, पंजाब दिल्ली बहुसंख्य राज्यातून भाजपच्या हातून जात आहे. जनता भाजपला नाकारत आहे. ही लोकशाहीतील परिवर्तनाची नांदी आहे.
यावेळी एका पत्रकाराने मोदी है तो मुमकीन है हा जो नारा होता तो या निकालाने खोडला गेला आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी सांगितले की, आतापर्यंत भाजपने याचा प्रचार केला मोदी है तो मुमकीन है. जनतेने जो निकाल दिला आहे. त्यावरून इथून पुढे एका व्यक्तीच्या नावावर सत्ताकारण चालणार नाही. कर्नाटकाचा निकाल ही तर लोकशाहीतील परिवर्तनाची नांदी आहे, कर्नाटकातील काँग्रेस विजयाने दक्षिणेतील सत्ता भाजपने गमावली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :