वाशीम : पुढारी वृत्तसेवा; वाशीम जिल्ह्यातील कारंजा मानोरा विधानसभेचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे आज शुक्रवारी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. आमदार राजेंद्र पाटणी हे गेल्या काही महिन्यांपासून आजाराशी झुंज देत होते. ते यातून बरे होतील, अशी आशा जिल्हावासीयांना होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. (Rajendra Patni passed away)
ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे.
त्यांचे निधन ही जिल्ह्याच्या विकासाची वैयक्तिक हानी आहे, त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यातील हळहळ व्यक्त केली जात आहे.
'ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपने गमावला'
राजेंद्र पाटणी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी याबाबत X वर पोस्ट केली आहे. "अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो." असे फडवणीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
हे ही वाचा ;