Latest

Ukraine-Russia crisis : ‘यूक्रेनमध्ये अडकलेल्यांना भारत स्वखर्चाने आणणार’

स्वालिया न. शिकलगार

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन : युक्रेनमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे अनेक भारतीय तेथे अडकले आहेत. (Ukraine-Russia crisis) यामध्ये मोठ्या संख्येने भारतातून या देशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या देशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करणे हे सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. (Ukraine-Russia crisis)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी भारत उड्डाणे पाठवणार आहे. ज्याचा खर्च सरकार उचलणार आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, रशियाने प्रमुख शहरांवर हल्ला आणि हल्ले घोषित केल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून युक्रेनने आपली हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळे युक्रेनची राजधानी कीवसाठी निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला काल परतावे लागले होते. युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद असल्याने हे अधिकारी जमिनीवरून प्रवास करत आहेत.

एका अनुमानानुसार, रशिया-यूक्रेन युद्धात जवळपास १६ हजार भारतीय यूक्रेनमध्ये अडकले आहेत. कारण, युक्रेनमधील सर्व हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहेत. म्हणून तेथील नागरिकांना बाहेर काढणे सरकारसाठी कठीण होत आहे. मात्र, त्यासाठी सरकारने नियोजन केले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताने हंगेरी आणि पोलंडच्या सीमेवरून सरकारी पथके पाठवली आहेत.

भारताने सुरक्षित मार्ग देखील ओळखले आहेत ज्याद्वारे ते युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याची योजना आखली जात आहे. भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले, 'सुरक्षित मार्ग ओळखण्यात आले आहेत. रस्त्याने, जर तुम्ही कीवहून गेलात, तर तुम्ही पोलंडला ९ तासांत आणि रोमानियाला जवळपास १२ तासांत पोहोचाल. रोड मॅप तयार करण्यात आला आहे.' परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) युक्रेनमधील भारतीयांना मदत आणि माहिती देण्यासाठी 24*7 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT