पुढारी ऑनलाईन डेस्क : अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झटापट झाली आहे. या झटापटीत दोन्ही देशांचे जवान जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये संघर्ष झाला आहे. भारतीय जवानांनी चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (India China Faceoff)
मात्र, अद्याप भारतीय सैन्याकडून अधिकृत माहिती दिलेली नाही. ऑक्टोंबर २०२१ मध्येही भारत-चीन सैन्यात अरूणाचल प्रदेशच्या यांगसे भागात झटापट झाली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या या झटापटीत भारताचे जवळपास ३० जवान जखमी झाले आहेत. तर चीनी सैन्यातीलही काही जवान जखमी झाले आहेत. परंतु, भारतीय सैन्यातील कोणताही जवान गंभीर जखमी झालेला नाही. (India China Faceoff)