पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज T20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या सुरूवातीला भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला आहे. (INDvsAUS 3rd T20)
या मालिकेतील नागपूर येथे झालेला सामना पावसामुळे 8 षटकांचा झाला होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियालवर विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे आजचा हैदराबादमधील सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. यामुळे आजचा सामना खूपच रोमांचक होण्याची शक्यता आहे.
या मालिकेत दोन्ही संघानी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. आता हैदराबादमधील सामना जिंकण्याचे लक्ष्य ठेवत दाेन्ही संघ मैदानात उतरतील. यामुळे आजचा सामना खूपच रोमांचक होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा;