मुंबई; पुढारी वृत्तसेवा : 'योगयोगेश्वर जय शंकर' ( Yog Yogeshwar Jay Shankar) या मालिकेत बालशंकर अंतापूर सोडून जगत कल्याणासाठी निघणार आहे. हा आध्यात्मिक टप्पा सध्या चरणसीमेवर असून चिमणाजी – पार्वती या दांपत्याने बालशंकरचा केलेला सांभाळ आणि आता त्याने त्यांना सोडून जाण्याचा क्षण निर्माण होणे, प्रेक्षकांना भावुक करणार आहे.
शंकर या दांपत्याला सोडून निघाला असला तरी त्याने आई पार्वतीची इच्छा पूर्ण करून तिला संततीसुख प्राप्त होईल याची दैवी रचना केली आहे, त्यानुसार पार्वतीला अपत्यप्राप्तीचे वेध लागले असून पार्वतीचे डोहाळे जेवण, शंकरच्या भावंडांचा जन्म असा रंजक कथाभाग मालिकेत सादर होणार आहे.
आई आणि मुलाच्या अनोख्या नात्याचा हा अनुपम सोहळा उमा पेंढारकर आणि आरुष बेडेकर यांनी विलक्षण मायेने संस्मरणीय केला आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ( Yog Yogeshwar Jay Shankar )
हेही वाचलंत का?