नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशात गेल्या तीन वर्षांमध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये ८८% वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे डिजिटल व्यवहारांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचे लेखी उत्तर देतांना दिली. (digital payment)
२०१८-१९ या आर्थिक वर्षात २ लाख ३२ हजार ६०२ कोटींचे डिजिटल व्यवहार झाले. २०१९-२० मध्ये हे प्रमाण ३ लाख ४० हजार २५ कोटींपर्यंत पोहचले.
तर,४ लाख ३७ हजार ४४५ कोटींचे डिजिटल व्यवहार २०२०-२१ मध्ये झाल्याचे डॉ.कराड म्हणाले.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने, प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, पैसे देण्यासाठीचा भारताचा स्वतःचा मंच 'यूपीआय'ला डिजिटल पेमेंटसाठी आवडता मंच म्हणून देशाने पसंती दिली.
वित्तीय वर्ष २०२०-२१ मध्ये २२ अब्जापेक्षा अधिक व्यवहार या मंचावर नोंदवला गेला.
गत तीन वर्षांमध्ये यूपीआयमध्ये चौपट वाढ दिसून आली आहे.
शिवाय, वित्तीय वर्ष २०२०-२१ मध्ये 'आधार'आधारित अवलंबित पेमेंट प्रणालीने आंतर-बँक व्यवहारांमध्ये गेल्या चार वर्षांच्या तुलनेत नऊ पटींनी वाढ झाल्याचे डॉ.कराड म्हणाले.