Latest

HBD Boney Kapoor : बोनी आणि अर्जुन कपूर यांच्या नात्यात आला होता दुरावा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बोनी कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आहेत. बोनी नेहमीच त्याच्या चित्रपटांबद्दलच नाही तर वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असतात. बोनी कपूरचे पहिले लग्न मोना शौरीशी झाले होते, त्यांना अर्जुन आणि अंशुला ही दोन मुले होती. ते अनेक वर्षे एकत्र राहिले. विवाहित आणि दोन मुलांचे वडील बोनी कपूर (HBD Boney Kapoor) यांनी जेव्हा श्रीदेवीला पाहिले तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला. सर्व अडचणींनंतर, बोनीने श्रीदेवीशी लग्न केले ज्यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. ११ नोव्हेंबर, १९५५ रोजी जन्मलेले बोनी आज त्यांचा ६७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी बोनी कपूर आणि त्यांचा मुलगा अर्जुन कपूर यांच्या नात्याबद्दल जाणून घेऊया. (HBD Boney Kapoor)

अर्जुनचा पहिला चित्रपट इशकजादे रिलीज होणार होता, त्याच्या ४५ दिवसांआधी त्याच्या आईचे निधन झाले होते.

बोनी यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी दुसरा विवाह केल्याचे सर्वश्रुत आहे. बोनी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर मोना खूपच तुटल्याचे म्हटले जाते. आईला अडचणीत पाहून अर्जुनचे बोनीसोबतचे संबंध बिघडू लागले होते. २०१२ मध्ये कॅन्सरमुळे मोना कपूरचे निधन झाले. अर्जुन आपल्या आईच्या खूप जवळ होता. आपल्या आईला वडिलांपासून दूर जाताना पाहून अर्जुनच्या मनात खूप राग होता. मोना कपूर यांनी खूप काही सहन केलं होतं, जेव्हा बोनी श्रीदेवी यांच्या खूप जवळ आले होते.

एका मुलाखतीत अर्जुनने म्हटले होते की, 'त्यावेळी माझ्या डोक्यात माझ्या आईचे संस्कार आले. आईने मला सांगितलं होतं की, कितीही अडचणी आल्या तरी, वडिलांसोबत नेहमी उभं राहायचं. माझ्या वडिलांना दुसऱ्यांदा प्रेम झालं होतं. आणि मी गोष्ट स्वीकारलीय. प्रेम दुसऱ्यांदा होऊ शकते.' अर्जुन म्हणाला होता की, 'तुम्हाला कोणावरही प्रेम होऊ शकतं. आणि हे सर्वांना माहिती आहे. मी हे नाही म्हणणार की, माझ्या वडिलांनी जे काही केलं आहे, ते योग्य आहे. कारण एक मुलाच्या नजरेने पाहिलं तर त्यावेळी मला खूप वाईट वाटलं होतं.'

यानंतर, २०१८ मध्ये अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाले, तेव्हा अर्जुन त्याच्या वडिलांसोबत आणि त्याच्या सावत्र बहिणी जान्हवी आणि खुशी कपूर यांच्या दुःख प्रसंगी उभा असल्याचे दिसले. दरम्यान, अर्जुन आणि बोनी यांच्यामधील जवळीकता वाढू लागली. आता त्यांच्यातील संबंध सामान्य झाले आहेत. अर्जुन अंशुलाप्रमाणे जान्हवी आणि खुशी या सावत्र बहिणींवरही प्रेम करतो.

SCROLL FOR NEXT