कसारा, शाम धुमाळ : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी प्रमुख धरण असलेले भातसा, तानसा, वैतरणा, मोडकसागर क्षेत्रात मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पाण्याची पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. मागीलवर्षा पेक्षा यंदाच्यावर्षी पाऊसाची सुरवात जरी उशीरा झाली असली तरीही मागीलवर्षा पेक्षा सर्व धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत चांगली वाढ झाली असल्याने मुंबई महानगरपालिकेची पाणी कपातीतून सुटका झाली आहे.
मागील पाच दिवसांपासून शहापूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांची पावसाअभावी रखडलेल्या शेतीच्या कामांना देखील तालुक्यात वेग आला असून, तालुक्यातील सर्व शेतजमिनी पाण्याने भरलेल्या असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. जून महिन्यात पाऊस कमी झाल्याने धरणातील पाणीसाठा कमी झाला हाेता.मुंबई महानगरपालिकेने काही क्षेत्रात पाणी कपात सुरू केली होती. मात्र जुलैच्या 2 तारखेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने तालुक्यातील भातसा, तानसा, वैतरणा, मोडकसागर धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे.
भातसा धरणाच्या आजची पाण्याची पातळी 122.50 मीटर असून मागीलवर्षी ती 114.58 मीटर होती, आज रोजी भातसा धरणाचा एकूण पाणीसाठा 519.734 दशलक्ष घन मीटर असून, मागीलवर्षी तो कमी होता. तर धरण क्षेत्रात आजचा पाऊस 127 मिलीमीटर झाला असून आजपर्यंतचा एकूण पाऊस 1053 मिलीमीटर एवढा झाला आहे. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली असून आजमितीस धरणाची पाणी पातळी 598.11 मीटर असून धरण क्षेत्रात 2700 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. धरणात एकूण पाणीसाठा 166.79 दशलक्ष घन मीटर आहे. तानसा धरणाची संपूर्ण भरून वाहण्याची क्षमता 421 .96 मीटर असून आजरोजी तानसा धरणाची पाण्याची पातळी 121.478 मीटर असून धरणात एकूण 65.58 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे . आतापर्यंत तानसा धरणात 681.00.मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा