Latest

अजित पवार गटाच्या ४० आमदारांना अपात्र करा; शरद पवार गटाची याचिका

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून गेलेल्या ४० आमदारांना अपात्र करा, अशी कडक भूमिका घेत शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी याचिका दाखल केली आहे.

अजित पवार गटाने ३० जून रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक याचिका दाखल केली होती. आपण पक्षाचे प्रमुख असून, पक्षाचे चिन्ह व नाव मिळावे, अशी मागणी त्यात केली होती. ९ सप्टेंबरपर्यंत त्यावर उत्तर सादर करण्याची मुदत आयोगाने दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी ई-मेलद्वारे आपले उत्तर कळविले. अजित पवार गटाने केलेले सर्व दावे त्यांनी फेटाळून लावले आहेत. उलट त्यांच्या चाळीस आमदारांना अपात्र करण्याची मागणी या ई-मेलद्वारे करण्यात आली आहे.

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शपथ घेतलेल्या नऊ मंत्र्यांवरच कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. यामागे दबावाची खेळी होती. मंत्री टार्गेट केल्यास अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार माघारी फिरतील, अशी शक्यता खुद्द शरद पवार यांना वाटत होती. परंतु, एकही आमदार परत आलेला नाही. तशी चिन्हेही दिसत नसल्यामुळे आणि अजित पवार यांनी पक्षावरच दावा सांगितल्यामुळे आता हा पक्ष आपलाच असल्याचे स्पष्ट करण्यासाठी शरद पवार यांनी ४० आमदारांना पाठिंब्याचे पत्र सादर करण्याची नवीन मागणी केली असल्याचे समजते. त्यावर आता अजित पवार गटाकडून कोणती भूमिका घेतली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT