Latest

Congress : कॉंग्रेसला आर्थिकदृष्ट्या अपंग बनवण्याचा प्रयत्न; सोनिया गांधीचा भाजपवर हल्लाबोल

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  निवडणूक रोख्यांचा मुद्दा हा गंभीर प्रश्न आहे. कारवाईच्या नावाखाली केंद्रीय संस्थाना हाताशी धरून कॉंग्रेस पक्षाला आर्थिकदृष्ट्या अपंग करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे असा आरोप आज (दि.२१) कॉंग्रेसच्यावतीने पत्रकार परिषदेत केला.

Congress : निवडणूक रोख्यांमधून भाजपने कोट्यावधी रुपये कमावले

यावेळी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, निवडणूक रोख्यांमधून भाजपने कोट्यावधी रुपये कमावले.  निवडणूक रोख्यांचा मुद्दा हा गंभीर प्रश्न आहे. याचा केवळ कॉंग्रेसवर नाही तर लोकशाहीवर परिणाम होणार आहे. कॉंग्रेसला आर्थिकदृष्ट्या अपंग करण्याचा प्रयत्न पंतप्रधान यांच्याकडून सुरु आहे. आमच्या पक्षाने जनतेकडून गोळा केलेला निधी गोठवला जात आहे. आमच्या खात्यातील पैसे बळजबरीरित्या काढून घेतले जात आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही निवडणुक प्रचारात टिकून आहोत.

यावेळी मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, निवडणूक रोख्यातून सर्वाधिक पैसे भाजपला मिळाले आहेत. त्यांनी काही कंपन्याकडून पैसे कसे घङेतले हे मी येथे सांगू शकत नाही. याबबतचे सत्य लवकरच सत्य समोर येईल देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हव्या असतील तर कॉंग्रेसला बॅक खात्या मधून पैसे काढण्याची परवानगी दिली पाहिजे. कोणताही राजकीय पक्ष आयकर विभागाच्या कक्षात येईल.

भारतात लोकशाही नाही : राहुल गांधी

राहूल गांधी परिषदेत बोलताना म्हणाले की, "काँग्रेस पक्षावरील गुन्हेगारी कारवाई आहे, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी केलेली गुन्हेगारी कारवाई आहे.  आज भारतात लोकशाही नाही. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे ही कल्पना खोटी आहे. संपूर्ण खोटे आहे. भारतातील २०% लोक आम्हाला मत देतात आणि आम्ही कशासाठीही 2 रुपये देऊ शकत नाही. निवडणुकीत आम्हाला पंगू करण्यासाठी हे रचले गेले आहे. आज जरी आमची बँक खाती गोठवली गेली असली तरी, भारतीय लोकशाहीचे मोठ्या प्रमाणावर कर्जाचे नुकसान झाले आहे."

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT