पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येकवेळी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील वयावरून टीका केली जाते. अनेकदा या कपलला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. पण, आता अखेर अर्जुन कपूरने मलायका सोबतच्या मौन सोडलं आहे. वयातील अंतराबाबत त्याने मोठं वक्तव्य केलं अजून, वय पाहून नात्याचा अंदाज लावणं चुकीचं असल्याचं त्याने म्हटलं आहे. (arjun kapoor)
मलायका आणि अर्जुन हे एकमेकांना ५ वर्षं डेट करत आहेत. पण, त्यांच्या वयातील फरकामुळे त्यांच्यावर नेहमी टीका होताना दिसतेय. मलायका अरोरा ही त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. दोघांनी आपलं प्रेम सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. दोघे अनेकदा क्वालिटी टाईम स्पेन्ड करण्यासाठी व्हेकेशनला जातात. त्यांचे नाते सर्वांपासून लपलेले नाही. दोघे मिळून अनेकदा पार्ट्यांना जातात. कित्येकदा तो मलायकाच्या घरी भेटायला जात असल्याचेही स्पॉट झालाय. इतक्या वर्षानंतरही त्यांच्या वयातील अंतरामुळे ट्रोल केलं जातं असल्याचं चित्र आहे. (arjun kapoor)
या सर्व गोष्टींना वैतागून त्याने म्हटलंय- सर्वात आधी मला वाटतं की, फक्त मीडियाच लोकांच्या कमेंटवर जास्त लक्ष देते. कोण काय म्हणालं हे तर आम्ही तर जवळपास ९० टक्के कमेंट्सवर लक्ष देत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या ट्रोलिंगला फार महत्त्व देण्याची गरज नाही. यातील अर्ध्यापेक्षा जास्त अकाउंट्स हे खोटे असातात.
तो पुढे म्हणाला, जे लोक आम्हाला ट्रोल करतात, त्यांच्यापैकी प्रत्येकजण आमच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सुक असतो. आम्ही मग कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय करतो हा माझ्या वैयक्तीक प्रश्न आहे. जोपर्यंत लोक माझं काम पाहत आहेत तोपर्यंत माझ्यासाठी बाकी सर्व गोष्टी केवळ गोंगाटाप्रमाणे आहेत. एखाद्याच्या वयावरून नात्याचा अंदाज लावला जातो, हे चुकीचं आहे.
त्यामुळे अशा गोष्टींमुळे मी आणि मलायका स्वतःला त्रास करून घेत नाही. तसं करणंही चुकीचं आहे. मग तुम्हाला तुमच्या वयावरून ट्रोल केलं जात असेल किंवा इतर काही. आम्ही फक्त आमचं आयुष्य जगत आहोत. आणि आम्ही दुसऱ्यांना त्यांचं आयुष्य जगू देतो. जेव्हा आम्हाला आमच्या वयातील अंतरावरून ट्रोल केलं जातं तेव्हा मला वाटतं हे खूपच बालिश आहे.