पुढारी ऑनलाईन डेस्क : आपण ११ आणि १२ एप्रिलच्या भागात पाहिलं अप्पीची मुलाखत ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्वल निकम आणि लेखक आणि IAS ऑफिसर 'विश्वास पाटील' यांनी घेतला. या मालिकेच्या निमित्ताने हे दोन ऑफिसर्स टेलीव्हिजनवर प्रथमच मालिकेत खरीखुरी भूमिका साकारताना दिसले. आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. अप्पीचा निकाल येत्या १६ एप्रिलला लागणार असून अप्पीची मेहेनत फळास येणार आहे आणि ती कलेक्टर होणार आहे आणि त्यानिमित्ताने अर्जुन, छकुली, दिप्या आणि सर्व गावकरी मिळून तिची मिरवणूक काढणार आहेत.
अप्पीने तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर झाली आणि या संघर्षात तिला खरी साथ मिळाली ती म्हणजे तिचे बापू, नवरा अर्जुन, भाऊ दिप्या यांची.