Latest

Hera Pheri 3 : हेरा फेरी ३ मध्ये अक्षय कुमार परतणार? सुनील शेट्टी म्हणाला, ‘मी त्याला समजावणार’

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने नुकताच खुलासा केला की तो हेरा फेरी 3 या चित्रपटाचा भाग होणार नाही. चित्रपटाच्या स्क्रिप्टवर त्यांने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अक्षय कुमारने हेरा फेरी ३ या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याच्या जागी अभिनेता कार्तिक आर्यनची या चित्रपटात एंट्री झाली. या सगळ्या दरम्यान, अक्षय कुमारच्या या निर्णयामुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत आणि तो चित्रपटात परत येईल अशी अपेक्षा करत आहेत. या संपूर्ण वादावर आता हेरा फेरीचा दुसरा अभिनेता सुनील शेट्टीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Hera Pheri 3)

या संदर्भात हेरा फेरी ३ चित्रपटाच्या निर्मात्यांशी बोलणार असल्याचं सुनील शेट्टी यांनी म्हटलं आहे. सुनील शेट्टी याने नुकतीच मिड-डे या इंग्रजी वेबसाईटला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने त्याच्या आगामी वेब सीरिजसह इतर गोष्टींबद्दल सांगितले आहे. हेरा फेरी 3 या चित्रपटाबाबत सुनील शेट्टी म्हणाला, 'सगळं काही सुरळीत होतं, पण मला कळत नाही की, अक्षय आता या चित्रपटाचा भाग का नाही. धारावी बँके या वेब सिरिजचे प्रमोशन संपले की, मी निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्या सोबत बसेन आणि हे का आणि कसे झाले ते समजून घेईन. अक्षय, परेश आणि मी आम्ही तिघांनी या चित्रपटासाठी संमती दिली होती आणि या ट्विस्टने मला आश्चर्यचकित केले आहे. (Hera Pheri 3)

अभिनेता सुनील शेट्टीने सांगितले, की तो अजूनही आशा बाळगून आहे की गोष्टी चांगल्या होतील. तो म्हणाला, 'हेरा फेरी 3 अक्षय शिवाय होऊ शकत नाही. राजू, बाबू भैया आणि श्याम ही प्रतिष्ठित पात्रे आहेत, ज्यांचा प्रवास एकत्र झाला आहे. या चित्रपटाचा उल्लेख केल्यावर यातील उत्साह दिसून येतो. मला पहायचे आहे की गोष्टी अजूनही दुरुस्त केल्या जाऊ शकतात. अक्षय कुमार नुकतेच एका कार्यक्रमा दरम्यान आपण हेरा फेरी 3 चित्रपटात काम करणार नसल्याचे सांगितले. (Hera Pheri 3)

यावेळी अभिनेता अक्षय कुमार म्हणाले, 'हेरा फेरी माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. लोकांच्या आणि माझ्या अनेक आठवणी त्याच्याशी जोडलेल्या आहेत. इतकी वर्षे चित्रपट बनला नाही याचेही मला वाईट वाटते. मी म्हटल्याप्रमाणे विघटित गोष्टी आहेत. आणि आपण वेगळा विचार केला पाहिजे. अक्षय कुमार पुढे म्हणाला, 'हा चित्रपट (हेरा फेरी 3) मला ऑफर करण्यात आला होता. पण पटकथेवर मी समाधानी नव्हतो. त्यामुळेच मी चित्रपटापासून दूर गेलो आहे. अक्षय कुमार हेरा फेरी ३ मधून बाहेरपडल्याने सर्वांनाच या गोष्टीचे वाईट आहे. आता बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टी निर्मात्यांशी बोलून या वर काही तोडगा काढतो का हे पाहावे लागेल.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT